लेख लेखन
खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा. ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याच वागण्या-बोलण्यातून जाणवतं तर कधी इतरांच्या नजरेतून. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?
तसेच, सौंदर्य म्हटलं की ‘स्त्री’ असं जणू त्रिकालाबाधित सत्यच ! त्यामुळे खरी मानसिकता दडून राहते. ती कालांतराने समोर येतेही. कुणाच्या हव्यासापोटी गुन्हे, अपराध घडतात तर कुणाच्या अविवेकी, गंज लागलेल्या बुद्धीच्या अतिरेकामुळे बदलाचा भयानक काळ दिसतो. अशा मानसिकतेला बदलणं जितकं सोपं तितकंच अवघड.
क्रूरपणे शरीर जाळणाऱ्या नराधमास ‘ती’चं कपड्यांवरून ठरणारं सौंदर्य महत्वाचं वाटलं नि तो आकर्षित झाला असा उघड न्याय दिला तर त्याच्या मनातल्या विकृत विचारांशी आणि तिच्या अस्तित्वाशी अन्यायच ! अशा मानसिकतेतून नकारात्मक व्यक्तिमत्व वैचारिक जगासमोर येत असताना ‘सौंदर्य’सुद्धा नकारात्मक होईल की काय अशी शंका घेण्यास जागा उरते. त्यामुळे हे चित्र पालटले पाहिजे. तेच हितकारी ठरेल.
व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा ! परंतु अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. मनापेक्षा सुंदर, निष्पाप आणि शुद्ध दागिना शोधूनही सापडणे नाही ! आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत आहे तसा. मनाला पटतं की जनाला हे तेवढं आत्मविश्वासाने आपल्यासाठी आपण ठरवायचं. कारण विचारांचं शस्र असो वा शास्त्र, नसेल पटत तर वापरयाचं नाही आणि झुगारून पुढे जायचं. फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !
आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं. विवेकी निर्णयक्षमता प्रत्येकात असते. आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं. 'चारित्र्य' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!
सौंदर्य चारित्र्य
“बाह्य सौंदर्याची जरी खाण
विचारांतून हवा साजेसा मान
मनाला पटणारा आत्मविश्वास
मग आपोआप पचतो अपमान”
विचारांतून हवा साजेसा मान
मनाला पटणारा आत्मविश्वास
मग आपोआप पचतो अपमान”
खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा. ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याच वागण्या-बोलण्यातून जाणवतं तर कधी इतरांच्या नजरेतून. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?
तसेच, सौंदर्य म्हटलं की ‘स्त्री’ असं जणू त्रिकालाबाधित सत्यच ! त्यामुळे खरी मानसिकता दडून राहते. ती कालांतराने समोर येतेही. कुणाच्या हव्यासापोटी गुन्हे, अपराध घडतात तर कुणाच्या अविवेकी, गंज लागलेल्या बुद्धीच्या अतिरेकामुळे बदलाचा भयानक काळ दिसतो. अशा मानसिकतेला बदलणं जितकं सोपं तितकंच अवघड.
“स्त्रीला वाटायला लागली आहे
अस्तित्वासाठी सौंदर्याची शिक्षा
बदलावी आता विकृत मानसिकता
वेळोवेळी का द्यावी लागे परीक्षा”
अस्तित्वासाठी सौंदर्याची शिक्षा
बदलावी आता विकृत मानसिकता
वेळोवेळी का द्यावी लागे परीक्षा”
क्रूरपणे शरीर जाळणाऱ्या नराधमास ‘ती’चं कपड्यांवरून ठरणारं सौंदर्य महत्वाचं वाटलं नि तो आकर्षित झाला असा उघड न्याय दिला तर त्याच्या मनातल्या विकृत विचारांशी आणि तिच्या अस्तित्वाशी अन्यायच ! अशा मानसिकतेतून नकारात्मक व्यक्तिमत्व वैचारिक जगासमोर येत असताना ‘सौंदर्य’सुद्धा नकारात्मक होईल की काय अशी शंका घेण्यास जागा उरते. त्यामुळे हे चित्र पालटले पाहिजे. तेच हितकारी ठरेल.
व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा ! परंतु अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. मनापेक्षा सुंदर, निष्पाप आणि शुद्ध दागिना शोधूनही सापडणे नाही ! आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत आहे तसा. मनाला पटतं की जनाला हे तेवढं आत्मविश्वासाने आपल्यासाठी आपण ठरवायचं. कारण विचारांचं शस्र असो वा शास्त्र, नसेल पटत तर वापरयाचं नाही आणि झुगारून पुढे जायचं. फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !
आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं. विवेकी निर्णयक्षमता प्रत्येकात असते. आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं. 'चारित्र्य' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!
“चारित्र्याला गालबोट लावणारा
सौंदर्य गुण नसावा निव्वळ देखावा
विश्वासाचं सुंदर बीज खुलवणारा
अंतर्मनाचा त्यात साथीदार हेरावा ”
सौंदर्य गुण नसावा निव्वळ देखावा
विश्वासाचं सुंदर बीज खुलवणारा
अंतर्मनाचा त्यात साथीदार हेरावा ”
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
नाशिक, नाशिक जिल्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा